Posts

फिल्म इंडस्ट्री आणि सत्य परिस्थिती

खरंतर चित्रपट क्षेत्राबद्दल नागरिकांना जे काही कळते ते फक्त पेपर, मासिक आणि टीव्ही वर दाखविल्या जाणारे त्यांचे सोहळे यातूनच. तो झगमगाट बघून इथे काम करणारा म्हणजे श्रीमंत असणार हा समज सगळ्यांचा असतो. पण सत्य खूप वेगळेच आहे. अमीर खान याने एकदा एका मुलाखतदरम्यान सांगितले की 100 कोटी चित्रपटाने कमविले हे किती खोटे आहे. एक चित्रपट मोठ्या कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांना घेवून केला तर खर्च कमीतकमी 70 कोटी येतो. सर्व प्रकारच्या जाहिराती चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण देशात पुन्हा 70 कोटी कमीतकमी खर्च होतात म्हणजे चित्रपटाचा खर्च होतो 140 कोटी मग चित्रपटाने कसे काय कमविले. उलट छोटे बजेटचे चित्रपट 1 करोड का होईना पण कमावतात. पण 100 कोटी कमाई हे सगळे खोटे आहे. आता ह्यात काम करणारे कलाकार व तंत्रज्ञ ह्यांना ह्या झगमगाट राहण्यासाठी खर्च सुद्धा तसाच करावा लागतो. म्हणजे कमाई 10 लाख पण खर्च 20 लाख ही अनेकांची परिस्थिती असते. म्हणजे इथे येणारे कर्जबाजारी जास्त होतात हे खरे आहे बाकी फक्त दिखावा आहे. अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ यांची म्हातारपणी जी दुर्दशा होते त्याला तेच कारण आहे. त्यामुळेच ह्या व्यवसायाल...

सामना

सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे हे जगजाहीर आहे. ह्याच सामन्यातून शाखाप्रमुख यांनी स्वतः पुढाकार घेवून केलेल्या कामाची बातमी असायची. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत आणि गणपतीत कोकणात जादा गाड्या शाखाप्रमुख पुढाकार घेवून सोडायचे. आणि हेच कोकणी कुटुंब शिवसेनेचे हक्काचे मतदार असायचे. गेल्या काही दिवसांपासून शाखाप्रमुख आपले हक्क जबाबदारी विसरले की काय? की त्यांचे अधिकार काढून घेतले की काय असे वाटू लागले आहे. कारण हल्ली सामना मध्ये तशी कोणतीही ठळक बातमी दिसत नाही. हल्ली सामना म्हणजे संजय राऊत आणि संजय राऊत म्हणजे शिवसेना अशी चुकीची प्रतिमा तयार होत आहे जी पक्षाला घातक ठरणार आहे हे अजुन तरी नेत्यांना कळत नाही किंवा कळले तरी वळत नाही. मीडिया सुद्धा शिवसेना कशी बदनाम होईल हेच बघत आहे आणि त्यांना संजय राऊत अप्रत्यक्ष पणे मदत सुद्धा करत आहेत. सोनू सूद हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आज पर्यंत अनेकांनी करोना च्या काळात वेगवेगळी मदत केली त्याला प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी सुद्धा दिली पण दुसऱ्या दिवशी त्याची कुठेच चर्चा झाली नाही. सोनू सुदने असे काय वेगळे केले ज्याने राऊत भडकले. त्यामुळे नको तेव्हढे महत्व...

covid 19 सद्यपरिस्थिती - परिणाम 2

मागील ब्लॉग लिहून फक्त 4 दिवस झाले. कोकणात चाकरमानी येण्यास सुरुवात झाली आहे. कालपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यात मिळून कमीतकमी 5000 चाकरमानी येवून धडकले आहेत. ह्या सर्वांची तपासणी, त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत काय ही चिंता. आपण फक्त एका जिल्ह्याचा विचार करूया. रत्नागिरी जिल्हा.. साधारण आठ दिवसापूर्वी हा जिल्हा फक्त 4 बाधित रुग्ण ते सुद्धा बरे झालेले ही स्थिती. जिल्हा आता ग्रीन झोन मध्ये जाणार ह्या आनंदात जिल्हा. आणि पुन्हा 4 रुग्ण सापडले जे चालत मुंबई वरून आले होते. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू. थोडे टेन्शन डॉक्टरच्या चेहऱ्यावर. आज 4 उद्या किती. आणि खरंच दुसऱ्या दिवसापासून रोज 4 ते 8 रुग्ण सापडू लागले. बघता बघता पन्नास रुग्ण संख्या ओलांडली गेली. आता सगळे चिंतेत. आणि कालची संख्या झाली 82. आता सगळीकडे एकच चर्चा सरकारने हा निर्णय का घेतला? मुंबईची साफसफाई करण्यासाठी आमचा बळी का? कोकण स्वर्ग आहे त्याचा नरक करायचा सरकारचा विचार नाही ना? कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा खूप आनंद झाला होता की आता खूप पर्यटक येणार. कोकण अजुन सुखी होणार. नागरिकांना वेगळा पर्याय मिळणार. पर्यटकांची सुर...

Covid 19 सद्य स्थिती व परिणाम

सध्याच्या corona आजारामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. कामगार आपल्या गावी जाण्यासाठी धडपड करत आहेत. प्रत्येक राज्यात विरोधी ह्या कामगारांना लवकरात लवकर त्यांच्या गावी पाठविण्यासाठी व्यवस्था व्हावी ह्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. पण हेच पक्ष जिथे सत्तेवर आहेत तिथे हतबल झालेले दिसत आहेत.  आपण फक्त आज महाराष्ट्राचा विचार करूया. विशेष करून कोकणातील माणसे गावी जाण्यास जास्त उत्सुक आहेत. पण कोकणातील आजची स्थिती काय आहे? खरंच कोकणातील जनता मुंबई व पुण्यातील चाकरमान्यांना स्विकारण्यास तयार आहे काय? त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार केला गेला आहे काय? आज कोकणात प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयाने बघत आहे. कोणाच्या घरी चुकून कोणी आले तरी त्याची तक्रार केली जात आहे आणि ह्यात अनेकांना मानसिक त्रास सुद्धा होत आहे कारण तक्रार करणाऱ्याचा उद्देश प्रत्येक वेळेस चांगला असेल असे नाही. दुसरीकडे वैदयकीयदृष्ट्या आपण तयारीत आहोत काय? शहरातील स्थिती बघता ग्रामीण भागात दारुण परिस्थिती निर्माण होवू शकते. होळी आणि गणपतीला कोकणात जाणाऱ्यांची संख्या बघता पुढे काय परिस्थिती निर्माण होईल ह्याची कल्पना करवत नाही. गाव...

विधानपरिषद निवडणूक 2020

विधानपरिषद निवडणूक ही बिनविरोध होणार. उद्धव ठाकरे यांच्या निवडीला कुठे धोका पोहोचणार नाही ह्याची काळजी सगळेच पक्ष घेणार. पण काँग्रेसचा 2 जागांचा आग्रह कायम राहिला तर एकतर शिवसेनेला आपल्या एका जागेला तिलांजली द्यावी लागेल अन्यथा धक्कादायक रिझल्ट आल्यास कोणालाही आश्चर्य वाटून घेवू नये. सध्या सामना मधून संजय राऊत जे लेख लिहीत आहेत त्याने ते बी जे पी बरोबरची दुरी अजुन वाढवत आहेच पण मित्र पक्षांबरोबर सुद्धा संबंध तुटण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची गरज आहे. उद्धवजी साहेबांनी सर्व पक्षीय मीटिंग घेवून त्याची सुरुवात केलीच आहे. राजसाहेब आणि बी जे पी दोन्ही सर्व सहकार्य करायला तयार आहेत पण सामन्यातील अग्रलेख बदलत नाहीत त्याच दिशेने जात आहेत.  आपण आपल्याच वक्तव्याने पक्षाला अडचणीत आणत आहोत हे संजय राऊत यांना कळत नाही ह्यावर कोणाचाच विश्वास नाही. आतातर ह्या सगळ्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असावा अशी शंका येत आहे. ही निवडणूक बिनविरोध होवो आणि उद्धवजी सारखा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुनः पुनः मिळो हीच सदिच्छा... 

विश्वास

लॉक डाऊन मध्ये माणसाचा माणसा वरील विश्वास कमी कमी होताना दिसत आहे. माणूस चिडचिडा होताना दिसतोय. खरंतर अनेक चांगल्या गोष्टी त्याला शिकता आल्या असत्या. काहींनी ह्याचा खरंच फायदा उचलला. अनेक ई बुक्स चे वाचन केले. जुने चित्रपट नाटके यांचे पारायण केले त्याचा त्यांना फायदाच झाला असणार. मग सर्वांनी असा विचार का नाही केला. गेलेला विश्वास पुन्हा निर्माण होईल काय? अशी सुवर्णसंधी पुन्हा लाभेल काय? असं म्हणतात की साडेसाती माणसाला खूप शिकवून जाते. ही पण साडेसाती समजून सामोरे जायला नको होते काय? मला विश्वास आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही पुनः विचार करालाच.